जळगाव । जळगाव शहरातील धांडे नगर, श्रद्धा कॉलनी परिसरातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून चोरी केली. गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या मंदिरात चोरी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीसोबतच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंदिरात चोरी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गाभाऱ्यात प्रवेश करून चोरट्यांनी नेमकी काय-काय वस्तू लंपास केली, याबाबतची माहिती पुढे येणे बाकी आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भरदिवसा आणि रहदारीच्या परिसरात मंदिरातच चोरी झाल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिवसा मंदिरच सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.















Discussion about this post