Monday, May 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे
बातमी शेअर करा..!

समता सप्ताहात अभिवादन व स्वाभिमान मेळावा उत्साहात संपन्न

जळगाव ।“समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, सहायक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, विशेष अधिकारी, अमोल कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री घुगे म्हणाले,भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, पण त्यात असमानताही आहे. ही असमानता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा मार्गच आपल्याला तारू शकतो. युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सोशल मीडियाच्या युगातही सखोल अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्र, कामगार कायदे तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापनेतील योगदान नमूद करत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसतीगृहाच्या अंकिता गजरे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट पणे पोवाडा सादर केल्याबद्दल तीचे कौतुक करत तरुणांमधील कला व सामाजिक जाणीवेचे स्वागत केले. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांच्या यशाचा उल्लेख करत जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर दीपमाला काळे यांनी संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना समान संधी मिळाल्याचे नमूद करत, विकासासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले. शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान ए.आय स्वीकारण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहनही केले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नायर आपल्या मनोगत म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य प्रत्येकाने आत्मसात करावे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही चार महत्त्वाची मुल्ये आपण नेहमी लक्षात ठेवून अंगीकारली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात वंचित समाजाच्या वेदना, दारिद्र्य आणि सामाजिक विषमतेचे वास्तव अधोरेखित केले. आपल्या लेखन व चित्रकलेतून उपेक्षित घटकांचे जीवन मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज व्यक्त केली. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्यावर भर देत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या साहित्याला मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाचा आहे, तसेच हा गौरव जळगाव जिल्ह्याचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, “मानवी हक्काचे प्रतीक चवदार तळे सत्याग्रह” या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले, चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नसून मानवी सन्मान व हक्कांसाठीचा संघर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या लेखनाचा सखोल अभ्यास आवश्यक असून केवळ जयंती साजरी करून थांबणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या उदाहरणातून सामाजिक समतेचा संदेश देत ते म्हणाले, भारताची तत्त्वज्ञान परंपरा ही सर्वांना समान दर्जा देणारी असून प्रत्येकाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करून समता, बंधुता व मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी “कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची नवी लाट” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, शेतीकडे उद्योजकतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲपचा वापर करून शेती विषयक माहिती उपलब्ध करून द्यावी, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेची तसेच विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. तरुणांनी शेती व उद्योग क्षेत्रात संधी शोधून उद्योजक बनावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्री पाटील यांनी समता सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली व कार्यक्रम आयोजनाचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय,निमशासकीय नोकरीचे नियुक्ती आदेशांचे वाटप तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे व विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. समाज कल्याण कार्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विविध पुरस्कार्थी, सबळीकरण योजनेचे लाभार्थी तसेच जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी यांनी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

Next Post

शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026

Recent News

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914