जळगाव/भुसावळ । आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव आणि परिसरातील भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठी आणि महत्त्वाची भेट दिली आहे. ओखा आणि तिरुपती दरम्यान धावणारी ‘साप्ताहिक विशेष रेल्वे’ आता कायमस्वरूपी ‘नियमित रेल्वे’ म्हणून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आरक्षणासाठी मोठी सोय होणार असून ऐन सुट्ट्यांच्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक ०९५२० / ०९५१९ ओखा ते तिरुपती साप्ताहिक विशेष गाड्यांचे नियमित सेवांमध्ये रूपांतर केले जाईल. गाडी क्रमांक १९५६० साप्ताहिक एक्सप्रेस ११ मेपासून दर सोमवार रोजी ओखा येथून २३.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी तिरुपती येथे २३.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक १९५५९ साप्ताहिक एक्सप्रेस १४ मेपासून दर गुरुवार रोजी तिरुपती येथून ०८.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ओखा येथे ११.५० वाजता पोहचेल.
या गाडीला द्वारका, खंभालिया, जामनगर, हापा, राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, विरमगाम, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, उधना, नंदुरबार, अमलनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, बोलारम, काचीगुडा, महबूबनगर, गदवाल, कर्नूल सिटी, डोन, ताडिपत्री, कडप्पा, राजमपेटा आणि रेनिगुंटा रेल्वेस्थानकावर थांबा राहणार आहे.















Discussion about this post