जळगाव |: जिल्हयात खरीप हंगाम २०२६ मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.
तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठयाचा अनुषंगाने येणा-या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.
या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधता येणार असून, यासाठी ७५८८०१३३९३ व ९९८५२१९००५ हे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ व टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वरही संपर्क साधता येईल. शेतकरी व संबंधित घटकांनी आपल्या अडचणी किंवा तक्रारी saojalgaon@gmail.com व zpjalgaonado@gmail.com या ई-मेलवरही पाठवू शकतात.
या नियंत्रण कक्षात मोहिम अधिकारी अविनाश खैरनार व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे हे अधिकारी कार्यरत असून तक्रारींचे निवारण करतील. जिल्हा प्रशासनाने शेतकरी व संबंधितांनी कोणतीही अडचण भासल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.















Discussion about this post