राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, काही निवडक भागांमध्ये मात्र जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर दिवसभरात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अल्पावधीत मुसळधार पाऊस होऊ शकतो.
दुसरीकडे विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात.
जळगाव जिल्ह्यात नागपूर येथून एनडीआरएफच पथक दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या पथकामध्ये एक चार अधिकारी व 30 जवानांचा समावेश आहे, यात दोन महिला जवान देखील आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे निर्माण नद्या नाल्यांना आलेल्या परिस्थितीमुळे झालेल्या जीवित हानी वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय.
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे अमळनेर, पारोळा तालुक्यात एकाचा बुडून मृत्यू झाला असून तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. उजनी धरणातून 80 हजार तर वीर धरणातून 63 हजार इतक्या विसर्गाने भीमा नदी वाहणार असल्याने नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.















Discussion about this post