मुंबई । भारतीय कामगार सेनेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील ऐतिहासिक शिवाजी मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून कामगारांच्या प्रश्नांसह देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार भाष्य केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांचा समाचार घेत “देश अराजकतेकडे चालला आहे, ईडीच्या माध्यमातून महिलांना त्रास दिला जातोय, कामगार रस्त्यावर उतरला की त्याला देशद्रोही ठरवले जाते,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
तसेच योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत, “जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर संसद भवन उद्घाटन किंवा राम मंदिर सोहळ्याला महिला खासदारांना का बोलावले नाही?” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीसांचे नाव न घेत लगावला टोला
ममता बॅनर्जी वाघिणीसारखी लढतं आहेत. त्या जिंकल्याच पाहिजेत. वल्लभभाई पटेल यांनी देशात काही भाग आणायला फौजा घुसवल्या होत्या व तुम्ही निवडणुका जिंकायला फौजा घुसवत आहात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. बंगालमध्ये तेच चाललंय. तिथं दोन लाखांवर जवान उतरवले आहेत. कोण करतील मतदान तिथं मग? “ड्रग्ज रॅकेट चालले, भोंदू बाबा वाढलेत व तिकडे बंगाल जिंकायला चाललेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नाव न घेता लगावला.















Discussion about this post