Sunday, August 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; मोहरी, पाम आणि सूर्यफूल तेल महागले, सर्वसामान्यांच्या बजेटला फटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 16, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ
बातमी शेअर करा..!

पेट्रोल-डिझेलपासून भाजीपाला आणि डाळींच्या वाढत्या दराने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोहरीचे तेल, पाम तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. पावसामुळे पुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाच्या आकडेवारीनुसार, देशभरात मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत सध्या १९७.२५ रुपये प्रति किलो आहे. एका महिन्यापूर्वी हा दर १९४.१५ रुपये होता. तर १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत केवळ ११८.२० रुपये होती. त्यामुळे वर्षभरात मोहरीच्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

पाम आणि सूर्यफूल तेलही महागले

पाम तेलाच्या दरातही वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी पाम तेलाचा दर १४९.५७ रुपये प्रति किलो होता, तर मागील वर्षी याच दिवशी तो १३०.२४ रुपये होता. म्हणजेच सुमारे २० रुपयांची वाढ झाली असून, ही वाढ जवळपास १४ टक्के आहे.

सूर्यफूल तेलाच्या किमतीतही सुमारे १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी सूर्यफूल तेलाचा दर १५९ रुपये प्रति किलो होता. आता तो १९१.१६ रुपयांवर पोहोचला आहे.

शेंगदाणा तेलाच्या दरातही वाढ झाली असून, सध्या त्याचा दर २०५.३९ रुपये प्रति किलो आहे. मागील वर्षी याच दिवशी शेंगदाणा तेलाचा दर १८५.२६ रुपये होता. म्हणजेच वर्षभरात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

पावसाचा पुरवठ्यावर परिणाम

पावसामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक आणि पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याने भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमतीही वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम खाद्यतेलाच्या बाजारावरही जाणवत आहे. आगामी काळात पुरवठा सुरळीत झाला नाही, तर खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने निर्यात होणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात करून तेल कंपन्यांना दिलासा दिला आहे. मात्र, या निर्णयाचा खाद्यतेलाच्या वाढत्या दरांवर थेट किती परिणाम होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

गिरीश महाजनांच्या नावापुढे ‘पालकमंत्री’! सिंहस्थ पुस्तिकेतील उल्लेखाने राजकीय चर्चांना जोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

गिरीश महाजनांच्या नावापुढे ‘पालकमंत्री’! सिंहस्थ पुस्तिकेतील उल्लेखाने राजकीय चर्चांना जोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

UPSC मार्फत प्रिन्सिपल आणि व्हाइस-प्रिन्सिपल पदांसाठी मेगाभरती; आजच अर्ज करा

August 16, 2026
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

गिरीश महाजनांच्या नावापुढे ‘पालकमंत्री’! सिंहस्थ पुस्तिकेतील उल्लेखाने राजकीय चर्चांना जोर

August 16, 2026
युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; मोहरी, पाम आणि सूर्यफूल तेल महागले, सर्वसामान्यांच्या बजेटला फटका

August 16, 2026
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 15, 2026

Recent News

UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

UPSC मार्फत प्रिन्सिपल आणि व्हाइस-प्रिन्सिपल पदांसाठी मेगाभरती; आजच अर्ज करा

August 16, 2026
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

गिरीश महाजनांच्या नावापुढे ‘पालकमंत्री’! सिंहस्थ पुस्तिकेतील उल्लेखाने राजकीय चर्चांना जोर

August 16, 2026
युद्धामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ

खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; मोहरी, पाम आणि सूर्यफूल तेल महागले, सर्वसामान्यांच्या बजेटला फटका

August 16, 2026
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 15, 2026
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914