Saturday, September 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2026
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…
बातमी शेअर करा..!

राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांतील खरीप पिके अडचणीत आली असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जात असतानाच नांदेडमधील एका आढावा बैठकीतील प्रकार चर्चेत आला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदामाचा पाहुणचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारावरून आता टीका होत आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे १८ आणि १९ सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर असून दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान मंत्री आणि लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदाम ठेवण्यात आल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान यावर चर्चा सुरू असताना बैठकीत असा पाहुणचार करण्यात आल्याने या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर काजू-बदामाच्या प्लेट हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अधिकाऱ्यांना डोकं नाहीये का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

राज्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा

दरम्यान, राज्यातील पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला असून सरकारने ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीआरएफच्या निकषांनुसार पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे नांदेडसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘कर्नाटकला जमलं, महाराष्ट्राला का नाही?’ दुष्काळाच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला सवाल

Next Post

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे १२ गाड्या रद्द, या एक्स्प्रेस धावणार उशिराने

September 19, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

September 19, 2026
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

September 19, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

‘कर्नाटकला जमलं, महाराष्ट्राला का नाही?’ दुष्काळाच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला सवाल

September 19, 2026

Recent News

प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे १२ गाड्या रद्द, या एक्स्प्रेस धावणार उशिराने

September 19, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

September 19, 2026
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

September 19, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

‘कर्नाटकला जमलं, महाराष्ट्राला का नाही?’ दुष्काळाच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला सवाल

September 19, 2026
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914