मुंबई । राज्यात मान्सून माघारी फिरताच ऑक्टोबर हिटचा तळाखा सुरु झाला. राज्यातील सर्वच शहरांचे तापमान वाढल्यामुळे नागरिक चांगलेच घामाघूम होऊ लागले आहे. परंतु आता राज्यातील ऑक्टोबर हिटचा चटका कमी झाल्यामुळे कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
ऑक्टोबर हिट आणि उन्हाचा चांगला चटका जाणवणाऱ्या जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरातील तापमानात बदल झाला आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. जळगाव शहरात १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान जास्त होते. महाबळेश्वरमध्ये १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, असे एका दिवसासाठी म्हणावे लागेल.
पुणे शहराच्या तापमानात घट झाली. पुणे शहरात रात्रीप्रमाणे दिवसाही तापमान कमी झाले आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३४.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तसेच मुंबईतील सांताक्रुझमध्ये राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु आता राज्यातील सर्वच शहरांचे तापमान आता कमी होऊ लागल्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.















Discussion about this post