देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, देशाच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारे चित्र समोर आले आहे. या निवडणुकीत केरळ आणि तामिळनाडू ही दक्षिण भारतातील दोन राज्ये वगळता भारतीय जनता पक्षाने (BJP) इतर राज्यांत मोठी मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे केरळमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने बहुमताचा आकडा सहज पार केला आहे.
केरळमध्ये कॉँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीने 94 जागांवर आघाडी घेतली असून बहुमताच्या आकड्याच्या पुढे ही संख्या पोहोचली आहे. तर सत्ताधारी माकप 41 जागांवर आघाडी आहे. तर भाजपला फक्त एका जागेवर आघाडी घेता आली आहे.
मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झीट पोलमध्ये कॉँग्रेसप्राणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचा पराभव होईल, असाही अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला होता.















Discussion about this post