युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडर तुटवड्याच्या चर्चांदरम्यान जळगाव शहरात पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांमुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने स्पष्टीकरण देत नागरिकांना दिलासा दिला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख केली जात आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून इंधन साठवू नये तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, चुकीची माहिती पसरवणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अधिकृत शासकीय माध्यमांवरूनच माहिती घेऊन शांतता व संयम राखावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.














Discussion about this post