मुंबई । मुंबईमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाचे दसरा मेळावा पार पडले. या मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. याच दरम्यान, शिंदेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे दावा
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत धक्कादायक विधान करताना सांगितले की, ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता.’, याची माहिती काढण्यात यावी अशी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करतो. मी बाळासाहेब यांच्याबाबत हे विधान जबाबदारीने करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर हातांचे ठसे घेण्यासाठी त्यांचा मृतदेह २ दिवस तसाच ठेवण्यात आला होता. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. २ दिवस त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर का ठेवला होता. त्यांचे अंतर्गत काय चाललं होतं?’, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
तसंच, ‘बाळासाहेब ठाकरें यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले आहे याची माहिती मला डॉक्टरांनी दिली होती. मातोश्रीवर तशी चर्चा देखील सुरू होती.’, असे देखील ते म्हणाले. ‘ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है. आमच्या मुळावर उठणार तर आम्ही बोलणारच. अजून खूप काही बाकी आहे. आम्ही हळूहळू सगळं बोलणार आहोत. हे तर काहीच नाही आहे. जेवढे माझ्या मुलाच्या मागे लागणार तेवढं मी अजून बोलणार. शिवसेना आम्ही वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली नाही. माझ्या मुलाच्या मागे लागताय. राजीनामा मागताय. त्याला टार्गेट करतात.हे सर्व सूड भावनेने तुम्ही वागत आहात.’















Discussion about this post