भारतीय संघानं आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत पुन्हा एकदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं. भारताने नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. दरम्यान युद्धभूमीवर पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, भारताने क्रिकेटच्या मैदानावरही त्यांचा अपमान केला आहे.आशिया कप २०२५ मध्ये भारताच्या विजयानंतर, रात्रीपर्यंत नाट्य सुरूच राहिले. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC ) अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाने नकार दिला.
नकवीकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचे कारण काय?
भारतीय क्रिकेट टीमने ACC चे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. नियमानुसार, विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याचा अधिकार ACC चीफचा आहे. पाकिस्तानातून येणारे मोहसीन नकवी फक्त ACC अध्यक्ष असते, तर टीम इंडियाने त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्याचा विचार केला असता, पण मोहसीन नकवी PCB अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये इंटिरियर मंत्री आहेत. नकवी हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. आता एका पाकिस्तानी मंत्र्याकडून टीम इंडिया कशी ट्रॉफी स्वीकारणार?. ते सुद्धा अशावेळी जेव्हा पहलाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडलेले आहेत.
वृत्तानुसार, भारतीय टीमला विजेतेपदाची ट्रॉफी मोहसीन नकवी यांच्या हातून न देता अमीरात क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या हातून द्यावी असं BCCI ने सांगितलं होतं. पण असं करण्याऐवजी ACC अध्यक्ष मोहसीन नकवी ती ट्रॉफी हॉटेलमध्ये घेऊन गेले. मोहसिन नकवी स्टेजवर येताच, भारतीय चाहत्यांनी “भारत माता की जय” अशी घोषणाबाजी सुरू केली.
मोहसिन नकवी स्टेजवर येताच त्यांना सांगण्यात आले की भारतीय संघ त्यांच्याकडून ट्रॉफी घेणार नाही आणि जर त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर अधिकृत निषेध नोंदवला जाईल. पण त्यानंतरच त्यांचं वर्तन BCCI साठी सुद्ध सहन करण्यापलीकडे होतं. ACC अध्यक्ष मोहसीन नकवी ती ट्रॉफी हॉटेलमध्ये घेऊन गेले.
बीसीसीआयने जोरदार फटकारले
आशिया कप फायनलनंतर पुरस्कार सोहळ्यात भारतीय संघाला विजेत्याचे पदक आणि ट्रॉफी देण्यात आली नाही. भारतीय संघ स्टेजवर आला आणि ट्रॉफी आणि पदकांशिवाय आनंद साजरा केला. देवजीत सैकिया यांनी खुलासा केला की बीसीसीआयने आधीच निर्णय घेतला होता की टीम इंडिया मोहसीन नकवी कडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. मोहसीन नकवी यांना ट्रॉफी आणि पदके सोबत नेण्याचा अधिकार नाही. हे अत्यंत दुर्दैवी आणि क्रीडा भावनेच्या विरुद्ध आहे. आम्हाला आशा आहे की ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत केली जातील.” असं देवजीत सैकिया म्हणाले















Discussion about this post