जळगाव । राज्यभरात सध्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदलीचे सत्र सूरू असून याच दरम्यान, एरंडोल तालुक्यातील फरकांडे शाळेतील शिक्षकांची बदली झाली होती. शिक्षकांच्या निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. यामुळे संपूर्ण शाळेत भावनिक वातावरण निर्माण झाले.
एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सतीश चव्हाण तसेच उपशिक्षक विजय पाटील आणि अनिल पाटील यांची नुकतीच बदली झाली.या तिघा शिक्षकांचा निरोप समारंभ नुकताच शाळेत पार पडला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेले हे शिक्षक विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याने वागत होते.केवळ अध्यापनच नव्हे तर शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केलेल्या त्यांच्या परिश्रमांचे कौतुक या समारंभात सर्व स्तरांतून करण्यात आले.
“ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये असे समर्पित शिक्षक मिळणे ही मोठी जमेची बाजू आहे.त्यांच्या मेहनतीमुळेच अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणात उत्तम यश मिळवले आहे.अशा शिक्षकांची शाळांना नितांत गरज आहे.”निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांसाठी गाणी, कविता सादर करून आपली भावना व्यक्त केली.या निरोप समारंभाचे वातावरण अतिशय हळवे झाले होते.शिक्षकांच्या डोळ्यांतही विद्यार्थ्यांविषयीचे ममत्व स्पष्टपणे दिसून येत होते.















Discussion about this post