यंदा देखील कापूससह सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहेत. यातच नाफेड मार्फत खरेदी होणाऱ्या सोयाबीनच्या आर्द्रतेची मर्यादा वाढली असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. परिणामी सोयाबीनला आता ४ हजार ८०० च्या वर दर मिळणार आहे.
सोयाबीन काढणी झाल्यानंतर काही दिवस शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने सोयाबीन विक्रीस काढला नव्हता. मात्र दिवाळीनंतर मिळेल त्या दरात विक्री करण्यास सुरवात केली. मात्र खुल्या बाजारात सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं केंद्र सरकारनं नाफेड मार्फत हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली सुरू केली. मात्र त्यामध्ये १२ टक्क्यापर्यंतच आद्रता असलेल्या सोयाबीनची खरेदी केली जात होती. आता ही अट शिथिल करून १५ टक्क्यापर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
सोयाबीनची आर्द्रता वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनला आता ४ हजार ८९२ रुपये या हमी भावाने सोयाबीनची खरेदी होणार आहे. आद्रतेची अट शिथिल करावी, यासाठी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या मागणीला यश आले आहे. या संदर्भातला आदेश शासनाने नुकताच काढला असून त्याबद्दल सुभाष ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानलेत.















Discussion about this post