मुंबई । आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं असून आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर प्रचंड गोंधळ घातला. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, येत्या तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘ शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी अनिल देशमुख आणि भाई जगतापही उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात येताच विरोधकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अंबादास दानवे आणि शिवसैनिकांनी पेढे वाटप केलं.
शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार धीर, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत टक्केवारी सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे.अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे. शेतकऱ्यांना अनुदान दिलं नाही, कर्ज मुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी यावेळी केली.
विरोधकांच्या घोषणा काय?
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बळीराजाचा बळी जात आहे. मंत्री सुखी, शेतकरी दु:खी, टक्केवारी सरकार, चोर सरकार आणि 40 टक्के सरकार हाय हाय… अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. त्यामुळे संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून गेला.















Discussion about this post