जळगाव । राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मिळालेल्या अपयशानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. फडणवीस आपल्या राजीनाम्यावर ठाम असून जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यांच्याजागीगिरीश महाजन यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागू शकते. देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
राज्यात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सध्याच्या घडीतील प्रमुख आणि सर्वात मोठे नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. याशिवाय त्यांनी गृहमंत्रीपदही सांभाळलं आहे. देवेंद्र फडणवीस हे डॅशिंग नेते आहेत. त्यांना लोकसभेत भाजपचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं, अशी मागणी केली आहे.
पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची माझी इच्छा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीमान्यानंतर राज्यातील उपमुख्यमंत्री पदाची माळ फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे
आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचं पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शुन्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत. ते राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही. त्यामुळे ते आपल्याकडे असणारी जबाबदारी कदाचित गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.















Discussion about this post