जळगावात येथे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. अशातच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपावर धक्कादायक आरोप केलाय.
उन्मेष पाटील यांनी, “भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी स्ट्राँग रुममध्ये फिरत आहेत. तसंच जनरेटर बॅक अप घेताना सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होणं ही बाब संशयास्पद आहे.” असा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होण्यामागे जे लोक कारणीभूत आहेत अशांवर कारवाई केली गेली पाहिजे असंही उन्मेष पाटील यांनी म्हटलं. त्याच बरोबर उन्मेष पाटील यांच्या आरोपांनीही खळबळ उडालीय.
दरम्यान. जळगवा आणि रावेर मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दोन्ही मतदारसंघातले ईव्हीएम हे स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. २६ मे च्या दिवशी सकाळी ९ ते सकाळी ९ वाजून ४ मिनिटं अशी चार मिनिटं सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद झाला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. मात्र वीज पुरवठा खंडीत झाला होा त्यामुळे जनरेटर, इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करत असताना ही चार मिनिटं गेली आणि डिस्प्ले बंद झाला होता असं उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. मात्र उन्मेष पाटील यांनी या प्रकरणी धक्कादायक आरोप केला आहे.















Discussion about this post