जळगाव । आठ दिवसांत जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण 50 लोकांचे मृतदेह आढळले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहेत. एकूण वाढलेल्या 50 मृतदेहा पैकी 16 जण हे बेवारस व अनोळखी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व बेवारस व्यक्तींवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन यांच्या आरोग्यदूत यांच्या टीमच्या मदतीने दपनविधी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरु आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 45°c वर पोहचाल आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात 25 मेपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत. तर उन्हात न फिरण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन जळगाव जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. त्यातच जिल्ह्यात विविध आजारांनी 50 मृतदेह आढळून आले आहे.
जिल्ह्याच्या विविध भागात आढळून आलेली हे मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात दाखल केली आहेत. या सगळ्याच मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.















Discussion about this post