जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांसह जिल्हा प्रशासन जलजीवन मिशन योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मक्तेदार संघटनेकडून जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तेदार संघटनेकडून देण्यात आला आहे.
सरकारचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन योजनेत अनेक अडचणी निर्माण होत आहे. पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जलजीवन मिशनचे कंत्राटदार व मक्तेदारांना योजनेच्या कामात अडचणी येत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील योजनेचे अनेक कामे बंद आहेत. दरम्यान या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मक्तेदार संघटनेकडून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान पाणीपुरवठा मंत्री व जिल्हा प्रशासन हे जलजीवन मिशन योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मक्तेदार संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्यास आगामी निवडणुकांवर देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तेदार संघटनांच्या वतीने देण्यात आला.















Discussion about this post