जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लष्कराने परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. बैसरंग भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या घटनेनं परिरसरासह पुर्ण देशात खळबळ उडाली आहे.
या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या.
नेमकं काय घडलं?
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना ‘तुम्ही मुस्लिम आहात का?’ असा सवाल केला. पर्यटकांनी नाही उत्तर दिल्यावर दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये चार पर्यटक महाराष्ट्रातील तर दोन पर्यटक पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
हेल्प नंबर जारी
दरम्यान, अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ एक नंबर जारी केला आहे. कोणत्याही पर्यटकाला काही अडचण असल्यास किंवा अशा काही घटना दिसल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. नंबर – 9596777669 यावर पोलिसांनी संपर्क साधण्यास सांगितलं आहे तर, 9419051940 हा व्हॉट्सअप नंबर आहे.
दिल्ली नियंत्रण कक्ष : 011 – 23438252 / 011 – 23438253 & 011 – 23093054 .















Discussion about this post