मुंबई । “मी ‘जय भीम’च्या घोषणा देतो, मग मुख्यमंत्र्यांना याला अराजकता म्हणायचे आहे का? त्यांनी बोलताना थोडा विचार करावा. ते उत्तर प्रदेशचे नाही, तर पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,” अशा कडक शब्दांत कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरुद्ध तरुणांच्या आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर अभिजित दीपके छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी परतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.तर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दीपके म्हणाले की, ‘मी ‘जय भीम’च्या घोषण देतो, त्यास अराजक म्हणायचं आहे का? त्यांनी थोडा विचार करावा. ते यूपीचे मुख्यमंत्री नाहीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जो महाराष्ट्र पुरोगामी आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, ते ‘जय भीम’च्या घोषणा देतात, ते त्यांना कसं काय अराजक म्हणू शकतात, जे विधान त्यांनी केलं. त्यावर मला लाज वाटली’.
परदेशात राहण्यावरून टीका झाली, त्यावर भाष्य करताना दीपके म्हणाले, एका पाकिस्तानीला दिल्लीत प्रदर्शन करू देता हे तुम्हाला म्हणायचं आहे का? वेदांत नावाच्या सीबीएससीच्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला सरकारने पाकिस्तानी म्हटलं आहे. त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, हा कारभार त्यांनी उघड केला. तेव्हा त्याला तुम्ही पाकिस्तानी म्हणतात’.
‘तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहात. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, रोजगार मागणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणता, मग भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि आयटीसीवाले भारतीय आहेत का? आम्ही पाकिस्तानी हे कुठपर्यंत चालणार आहे, असा सवाल त्यांनी पुढे केला.















Discussion about this post