जळगाव । जळगाव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एक आव्हान केलं आहे. संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवून जिंकून येवून दाखवावेच, असे गिरीश महाजन यांनी दिले आहे.
खासदार संजय राऊत हे नेहमी अवाहन देत असतात.माझा साधा शिवसैनिक उभा राहिला, तरी निवडणूक जिंकून येईल आणि पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे.
त्यामुळे त्यांनी आता ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावीच. गप्पा करणे, गोष्टी करणे हे सर्व सोपं असतं. परंतु माझे त्यांना आव्हान आहे.त्यांनी खासदारकीला उभे रहावेच. ते कधी साधी महापालिकेची निवडणूकही लढलेले नाहीत.
मात्र, मोठ-मोठ्या गप्पा मारत असतात. त्यामुळे खासदारकीच्या निवडणूकीत आपल्याला किती मते पडतात, हे त्यांनी एकदा तपासून पहावे, असा टोलाही त्यांनी खासदार राऊत यांना लगावला.















Discussion about this post