Sunday, May 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका

जळगाव | खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने मिशन मोडवर कामे करावीत. बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून तत्काळ गुन्हे दाखल करावेत. एकही शेतकरी बियाणे, खत व पीककर्जापासून वंचित राहू देऊ नका, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचे आवाहन

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये. किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कमी कालावधीतील वाण, आंतरपिक पद्धती आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी कृषी विभागाने गावागावात जनजागृती मोहीम राबवावी. डीएपी खताची मागणी वाढत असल्याने एसएसपीसारख्या पर्यायी खतांचा वापर वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर असून यंदा ४ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र कापूस पिकाखाली प्रस्तावित आहे. खरीपासाठी आवश्यक २२ लाख १० हजार कापूस बियाणे पाकिटांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आतापर्यंत ४ लाख ५६ हजार ५३ पाकिटे उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना  निर्देश

बोगस निविष्ठांविरोधात प्रशासनाने अधिक सतर्क राहावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. अप्रमाणित खत विक्रीप्रकरणी दोन पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले असून ५.४७ मेट्रिक टन खतसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच चोपडा व एरंडोल येथे बनावट एचटीबीटी बियाण्यांप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून १० लाख २० हजार रुपये किंमतीची ८५० पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात भरारी पथके नियुक्त करून शेतकऱ्यांना बियाणे व खतांची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कार्यवाही करून तक्रारींचे निरसन करावे, असे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले. महावितरण विभागाला खरीप हंगामात अखंडित वीजपुरवठा देण्याचे निर्देश देत नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यास सांगण्यात आले.बँका व वित्तीय संस्थांनी पीककर्ज वितरण वेळेत पूर्ण करावे. शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार बँकांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत. शासनाच्या योजनांमधून मिळणारा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.बैठकीच्या शेवटी “काम वेळेत करा, शेतकऱ्यांना फिरवू नका आणि निर्णय तात्काळ घ्या,” अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, असे सांगितले. मत्स्यउत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. यंदा पाऊस उशिरा होण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याचे नियोजनही प्रभावीपणे करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेसे खत उपलब्ध राहील यासाठीही दक्षता घेण्यास सांगितले.

 

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे आवाहन

वस्रोद्योग मंत्री यांनी शेतकऱ्यांना तुती पिकांची लागवड करण्याचे आवाहन केले. तुती हे नगदी पीक असून त्याला चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे तुती लागवड शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

 

यासंदर्भात कृषी विभागाने तालुका स्तरावर बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी व नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. याकडे वीज वितरण विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

विमोचन व अन्य माहिती

बैठकीच्या सुरुवातीला कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडयुक्त घडीपत्रिकांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यामध्ये कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन तसेच खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीचा समावेश होता.

 

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासनातर्फे खरीप हंगामासाठी सुरू असलेल्या तयारीची तसेच तुती लागवड आणि उत्पादनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

 

प्रास्ताविकात जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा सादर केला. 

 

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५७२४ अवजारांसाठी ३७ कोटी ९० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत २३ शेतकरी उत्पादन कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून २२७७ लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ८६ हजार ५१२ शेतकऱ्यांना ६४५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३१९ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेत १२२८ प्रकल्प मंजूर झाले असून जिल्ह्यात १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

 जिल्ह्यासाठी ३ लाख ६५ हजार ८०० मेट्रिक टन खत आवंटित करण्यात आले असून सध्या १ लाख ६५ हजार ५५९ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

Next Post

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा 'डबल अटॅक'; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा 'येलो अलर्ट'!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026
भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

May 16, 2026

Recent News

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026
भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

May 16, 2026
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914