मुंबई । तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांच्या TVK (तमिळगा वेत्री कळघम) पक्षाने १०८ जागा जिंकत सर्वांचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्याकडे ११३ आमदारांचे बळ असले, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ च्या आकड्याअभावी राज्यपालांनी अद्याप त्यांना निमंत्रण दिलेले नाही. या घटनात्मक पेचप्रसंगावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली असून, त्यांनी ऐतिहासिक दाखले देत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यपालांना संविधानाच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. त्यांच्या मते, “एखाद्या पक्षाकडे पूर्ण बहुमत नाही, केवळ या कारणास्तव राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण नाकारू शकत नाहीत. कलम १६४(२) नुसार, बहुमताचा फैसला हा राजभवनात नाही तर विधानसभेच्या पटलावर व्हायला हवा.”
Vijay's TVK, which is the single largest party, should be invited by the Governor to become the Chief Minister and form the government in Tamil Nadu.
The Governor cannot not withhold the invitation to Vijay over his "doubts of TVK not having majority figures." Under Article 164… https://t.co/oc4CKkNOAo
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 7, 2026
आंबेडकरांनी करून दिली ‘या’ दोन मोठ्या घटनांची आठवण:
1989 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 194 जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा जिंकूनही राजीव गांधी यांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिला. त्यांना राष्ट्रपतींनी सर्वात अगोदर सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आणि 2 डिसेंबर 1989 रोजी ते पंतप्रधान झाले.
तर 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण भाजपकडे स्पष्ट बहुमत नव्हते. तरीही राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सत्ता स्थापनेसाठी पाचरण केले होते. त्यांनी शपथ घेतली. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 13 दिवसांनी 28 मे 1996 रोजी त्यांनी राजीनामा दिला. याची आठवण आंबेडकर यांनी ट्विट करत करून दिली.















Discussion about this post