राज्यात नव्या पद्धतीने जवळपास ७० हजार पदांची भरती केली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. या भरतीमध्ये हजारो पदे ही मुंबई महापालिकेत भरती केली जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेत तब्बल ५७ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे भरावी, अशी मागणी आता केली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावलीत सुधारणा करण्याबाबत बैठक पार पडली होती. यामध्ये राज्यात नोकर भरती राबवण्यात येईल. ७० हजार पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील, अशी घोषणा करण्यात आली. यानंतर महापालिकेतील रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेच्या निवडणूका झाल्या आहेत. त्यानंतर नोकरभरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली जात आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र पाठवून रिक्त पदे भरण्याची मागणी केली. या पत्रात म्हटलंय की, पालिकेत १२९ विभाग कार्यरत आहेत. यात ४ रुग्णालयाचे, प्रसतिगृहे, १६ उपनगरीय रुग्णालयचे आहे. या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या महापालिकेत ९० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. रिक्त पदांवर भरती करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
मुंबई महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात येतील, असं आश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीने दिले आहे. रुग्णालयातील रिक्त पदांवर कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. कंत्राटी भरती बंद करावी आणि पदभरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.














Discussion about this post