मुंबई । राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि १२५ पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवार हे अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिंतीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. जिल्ह्यात सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी २२ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर भाजप १५ आणि शिवसेना (शिंदे) ३ जागेवर आघाडीवर आहे.
पुण्यातील मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या पाच पैकी ३ जागांवर अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर तर २ जागांवर भाजप आघाडीवर आहे. याशिवाय आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पिछाडीवर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा या ठिकाणी भोसरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवून राज्याला पहिला निकाल दिला आहे.
विभागीय कुठे कोणाला कल?
कोकण (सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी)
महायुतीने मतमोजणीपूर्वीच २७ जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. यात सिंधुदुर्गाती ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समितींचा समावेश होता.
रत्नागिरीत नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे गटाच्या डॉ. पद्मजा कांबळे विजयी झाल्या आहेत.
महाडमध्ये अनिल जाधव (शिंदे गट) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर)
पुणे: जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळमध्ये टपाली मतदानात अजित पवार गटाचे वर्चस्व आहे.
सांगली: भाजप १० जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी (अजित पवार) २ जागांवर आहे.
सातारा: पाटणमध्ये शंभूराज देसाईंच्या नेतृत्वात शिवसेनेने खाते उघडले असून मंगल माने विजयी झाल्या आहेत.
मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव)
लातूरमध्ये काँग्रेसने सुरुवातीला चांगली मुसंडी मारली आहे.
परभणीत पिंगळी गटात ठाकरे गट आघाडीवर आहे, तर जिंतूर-भोगाव गटात शरद पवार गटाचे कृष्णा देशमुख आघाडीवर आहेत.















Discussion about this post