जळगाव । महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी भावनिक सादही घातली जाते. भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा विचार आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. आता आपण बघतो आहे, एमआयएमची कुणासोबत युती..त्यामुळे कोणी कोणासोबत जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र होतील का ? तर राजकारणात काहीही होऊ शकते, असे मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. दोन्ही भाऊ एकत्र आले, भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? या प्रश्नांवर मंत्री गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिंदे सेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांची भूमिका लवचिक आणि टणक आहे. भूमिका प्रत्येकाला वेगवेगळी घेता येते. त्यांची कधी भूमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा हा राज ठाकरे यांचा व्यक्तिगत विषय आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.















Discussion about this post