जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान होत आहे मात्र निवडणुकीच्या दिवशी जळगाव शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पिंप्राळा भागातील आनंद मंगल नगर परिसरात दोन तरुणांमध्ये जुन्या वादाचे पर्यावसान भांडणात झाले आणि रागाच्या भरात एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना आज दुसरी २ वाजेच्या सुमारास घडली घडली.
या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.
मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “हा गोळीबार दोन गटांतील वैयक्तिक वादातून झाला असून, त्याचा महापालिका निवडणूक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.” सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.















Discussion about this post