मुंबई । महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपचे ४४ नगरसेवक जिंकलेत. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. याचदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढवणारा दावा केलाय.
सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजवीर भाष्य करताना एक मोठा दावा केलाय. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रिय झालाय, असे म्हणत नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केलं.
नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हणत नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला. विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावावरुन त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली. विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे. निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असे म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी हल्लाबोल केला.















Discussion about this post