छत्रपती संभाजीनगर । एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीसाठी रणसंग्राम सुरु असताना अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एक मोठी कारवाई केली. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आणि शिस्तभंग केल्याच्या कारणावरून भाजपने तब्बल 22 जणांना पक्षातून काढून टाकले आहे
महापालिका निवडणुकीत काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षातून उमेदवारी स्वीकारली, तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यासोबतच पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी वक्तव्ये केल्याचाही ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.
भाजपच्या नियमांचे आणि शिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यानुसार बंडखोरी करणारे, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे तसेच पक्षशिस्त भंग करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पक्षशिस्त आणि संघटनात्मक मजबुती राखण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले असून, भविष्यातही पक्षविरोधी कारवायांना माफी दिली जाणार नाही, असा इशाराही जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेकडून देण्यात आला आहे.















Discussion about this post