नाशिक । नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या सरकारवर चांगलाच निशाणा साधला जातोय. वृक्षतोडीवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू असून ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये ‘मुंह मे राम, बगल मे अडानी’ असे काम करायचे, अशा हिंदुत्वाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवर ठाकरे यांनी भूमिका मांडली. प्रभू रामचंद्र वास्तव्याची श्रद्धा असलेल्या तपोवन परिसराचा विनाश करण्याचा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तपोवनात 60 हून अधिक प्रजातींची झाडे, त्यातील अनेक औषधी वनस्पती आणि ऐतिहासिक परंपरा असताना, कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली येथे ‘कत्तली’ होणार असल्याचे ते म्हणाले.
या तपोवनाने आपल्याही पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेले असतील. गिरीश महाजन म्हणतात, एक झाड कापलं तर दहा झाड लावणार तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत? असा सवाल करत आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.















Discussion about this post