मुंबई । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका दिला आहे. EDने रिलायन्स ग्रुपची अंदाजे ₹३,०८४ कोटीपेक्षा अधिक संपत्ती अस्थायी जप्त केली.
ईडीने हे पाऊल मनी लॉन्ड्रिंग निवारण अधिनियम (PMLA) अंतर्गत उचललं आहे. जी प्रॉपर्टी जप्त केलीय, त्याची यादी मोठी आहे. मुंबईस्थित वांद्रे येथील पाली हिलचं घर, दिल्लीचं प्रमुख रिलायन्स सेंटर, त्याशिवाय दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपूरम आणि पूर्व गोदावरी सारख्या प्रमुख शहरातील जमिनी, कार्यालयं आणि फ्लॅट जप्त केले आहेत. एकूण मिळून अनिल अंबानी ग्रुपच्या 40 पेक्षा जास्त प्रॉपर्टीवर कारवाई झाली आहे.
काय प्रकरण आहे?
ईडीच्या चौकशीनुसार, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) यांनी जनतेकडून आणि बँकांकडून गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केला. २०१७ ते २०१९ दरम्यान, येस बँकेने आरएचएफएलमध्ये अंदाजे ₹२,९६५ कोटी आणि आरसीएफएलमध्ये ₹२,०४५ कोटी गुंतवले. ही गुंतवणूक नंतर बुडाली.
भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड (SEBI) नियमांच उल्लंघन केल्याचं सुद्धा चौकशीत समोर आलय. म्यूचअल फंडद्वारे जमा केलेला जनतेचा पैसा अप्रत्यक्षरित्या रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांमध्ये पोहोचला. फंड फिरवून येस बँकेच्या मार्गाने या कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला. फंड डायवर्जनसाठी विचारपूर्व योजना बनवण्यात आलेली असा ईडीचा आरोप आहे. एजन्सीने अनेक गंभीर अनियमिततेचा हवाला दिला आहे.















Discussion about this post