प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने १,७०२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कामासाठी घर सोडून महानगरात आलेल्यांना सणासुदीला घरी जाता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘मध्य रेल्वे दिवाळी आणि छठनिमित्त १,७०२ विशेष गाड्या चालवत आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथून निघतील. यांपैकी ८०० हून अधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांसाठी असतील. याव्यतिरिक्त देशाच्या इतर भागांमध्येही गाड्या जातील. वाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त तिकीट काउंटर सुरू करण्यात आले आहेत’, असे स्वप्नील निला यांनी सांगितले.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर ३,००० पेक्षा जास्त प्रवाशांची क्षमता असलेले प्रतीक्षा क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये अन्न, पाणी, स्वच्छतागृहे आणि पंखे यासारख्या सुविधा आहेत. याशिवाय तिकीट बुकिंगसाठी मोबाईल यूटीएस सेवा उपलब्ध आहे, तसेच अतिरिक्त तिकीट काउंटर देखील उघडण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
उत्तर पश्चिम रेल्वेने दिवाळी आणि छठसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबई, पुणे, हावडा आणि बिहार येथून जवळच्या भागात ४४ जोड्या विशेष गाड्या धावत आहेत. दिवाळी आणि छठसाठी ४४ जोड्या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. गरजेनुसार आणखी गाड्या जोडता येतील. याव्यतिरिक्त, ६० नियमित गाड्यांमध्ये १७४ अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी जयपूरसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षालय तयार करण्यात आले आहेत, असे उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ कॅप्टन शशी किरण यांनी सांगितले.














Discussion about this post