मुंबई । मुंबई येथील नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सध्या देशभरात चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे व्होट चोरीचा. याच दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज दिलं. जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, असे राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितले.
अंबानी- अंदानींना शहरं द्यायची असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, ‘हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही ते सांगताता की बोगस मतदार भरले आहेत याद्यांमध्ये. म्हणजे कोणत्या निवडणुका आपल्याकडे चालू आहेत. हे गेल्या १० -१२- १५ वर्षातच का प्रश्न पडले.
जी लोकं भाबळेपणाने मतदान करत आहेत, उन्हात उभे राहून मतदान करत असतील त्यांच्या मताला किंमत नसेल तर कशासाठी निवडणुका लढवायच्या आहेत. केंद्रात आम्ही, राज्यात आम्ही, पालिकेत आम्हीच, जिल्हा परिषदेतही आम्हीच पाहिजे यासाठी हे सगळं चालले आहे. राज्यातील शहरं अदानी -अंबानींना द्यायची आहेत यांना. शहरं अदानी अंबानीला आंदण द्यायचे म्हणून हे सर्व चालू आहे’
राज ठाकरेंनी मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी सर्वसामान्य मतदारांनाही सतर्क राहण्याची विनंती केली. तसेच एका एका घरात ८०० मतदार भरत आहेत. खोटी नावं भरून यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार. यादी प्रमुखांना त्यााठीच बोलावले आहे. सर्व यादी प्रमुखांनी घरोघरी जावे. जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका. तसं जर नाही झाले तर निवडणुका घेऊनच दाखवा. सर्व पक्षांनी घराघरात गेलं पाहिजे आणि याद्या तपासल्या पाहिजे. आधीच ५ वर्षे झाली आहेत निवडणुका घेऊन आणखी १ वर्षे गेले तरी चालले. जोपर्यंत यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.’ , असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला थेट इशारा दिला.















Discussion about this post