नंदुरबार । आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार मध्ये आज मूक मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलक आणि पोलीस यांच्यात झडप झाली असून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गाड्यांची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील केला.
काही दिवसापूर्वी नंदूरबार शहरात दोन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या आदिवासी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जय वळवीचा खटला लवकर न्यायालयात चालवावा आणि जयवडवी याला न्याय मिळवून द्यावा, तसेच जय वळवीवर हल्ला करणाऱ्या सूर्यकांत मराठे या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणीही आदिवासी संघटनांनी केली आहे
मात्र, या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले असून पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर, मोर्चात सहभागी झालेल्यांनी सैरावैरा धावपळ केल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.















Discussion about this post