मुंबई : दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही विशेष बदल होतात. १ सप्टेंबरपासून काही विशेष बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होईल. त्यापैकी प्रमुख म्हणजे चांदीबाबत 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहे.
केंद्र सरकारने चांदीच्या शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून आता 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगची मोहोर उमटणार आहे. सध्या चांदीच्या किमतीने इतिहास रचला असून त्यामुळं चांदीत भेसळ होण्याची शक्यता असते. त्यासाठीच सरकारने आता चांदीवरही हॉलमार्क लागू केला आहे.
हॉलमार्किंगची प्रक्रिया ही सोन्याच्या दागिन्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हॉलमार्किंगनुसारच असणार आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सकडून लागू करण्यात आलेल्या या नियमांनुसार चांदीची गुणवत्ता आणि शुद्धता ओळखणे ग्राहकांना सोप्पे जाणार आहे. या नियमामुळं चांदीच भेसळ करणारे किंवा फसवणूक करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण दागिने मिळणार आहेत.
चांदीसाठी असतील 6 नवीन हॉलमार्क
चांदीच्या शुद्धतेची तपासणीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने 6 मानक तयार केले आहेत. या मानकच्या माध्यमातून चांदी किती टक्के शुद्ध आहे हे पडताळले जाईल. नवी व्यवस्थाअंतर्गंत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने चांदीसाठी एकूण सहा शुद्धतेचे नियम ठरवले आहेत. यात 900,800,835,925,970 आणि 990 असे सहा टप्पे असतील.
हॉलमार्क का गरजेचा?
हॉलमार्क हे केंद्र सरकारच्या बीआयएस या संस्थेने दिलेली एक प्रमाणित खूण असून ती चांदी किंवा सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता सिद्ध करते.
हॉलमार्क का महत्त्वाचे?
कोणत्याही दागिन्यांची खरेदी-विक्री करताना त्याची शुद्धता समजते. तसेच व्यवहार चोख आणि पारदर्शकपणे होण्यास मदत होते. ग्राहकास गरज पडल्यास तक्रार नोंदवण्यासाठी आधार मिळतो. पुन्हा विक्रीच्या वेळी योग्य किंमत मिळते.















Discussion about this post