मुंबई । राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळधार पाऊस पडत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात विविध ठिकाणी शाळा-कॉलेजलादेखील सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान आज देखील राज्यातील अनेक ठिकाणी हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिला असून त्याच पार्श्वभूमीवर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांसह विदर्भातील चंद्रपूर, तसेच सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, धुळे, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाचा जोर ओसरणार
दरम्यान मध्य भारतावर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात आज २० ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.















Discussion about this post