मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता लागून राहिलेली पहिली गुणवत्ता यादी अखेर दोन दिवस आधीच जाहीर करण्यात आली आहे. ही यादी मूळतः 30 जून रोजी जाहीर होणार होती, मात्र शिक्षण संचालनालयाने ती आजच प्रसिद्ध केली आहे.
मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी प्रतीक्षेत होते. यंदा राज्यभरातून 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालक https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर पहिली गुणवत्ता यादी पाहू शकतात.
सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 30 जून ते 7 जुलै या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. संगणक प्रणालीमध्ये आवश्यक बदल करून प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुस्थितीत पार पडावी यासाठी यादी 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. मात्र, ही यादी आजच (28 जून) जाहीर करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना 1 जुलैपासून 7 जुलै या कालावधीत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाला असून त्यानंतर जवळपास दीड महिना उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना अकरावीतील प्रवेश मिळालेला नाही. यंदा राज्यभरातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, त्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली गुणवत्ता यादी तपासून कॉलेज निवडण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post