मुंबई । राज्यात मागच्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, पुढील ३६ तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीस मनाई केली आहे. पूर आणि पाणी साचण्याची भीती असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कर्नाटक आणि गोव्याच्या जवळ समुद्रात सायकलॉन सर्क्युलेशची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ३६ तसांमध्ये ते अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे कोकण , मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार असल्याची माहिती मिळतेय. हे कमी दाबाचे क्षेत्र सायकलॉन सर्क्युलेशची स्थितीमुळे उत्तरेकडे तीव्र वेगाने सरकतंय. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच स्थितीमुळे मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास देखील प्रशासनाकडून मानाई करण्यात आली आहे.















Discussion about this post