Sunday, August 10, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शिक्षणातून पूर्णत्वाचा प्रवास व्हायला हवा ; प्रा. प्रकाश पाठक

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
March 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
शिक्षणातून पूर्णत्वाचा प्रवास व्हायला हवा ; प्रा. प्रकाश पाठक
बातमी शेअर करा..!

विद्यापीठात ‘स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

जळगाव l शिक्षण म्हणजे माहिती नव्हे तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या मूळ क्षमता आणि परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे असे स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाविषयी मत मांडलेले आहे. वर्तमान शैक्षणिक धोरणात त्याचा विचार केला गेला आहे असे प्रतिपादन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. १८ मार्चपासून ‘स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात बीजभाषण करतांना प्रा. पाठक बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संचालक प्रा.म.सु.पगारे व प्रा.मधुलिका सोनवणे, निमंत्रक प्रा.अतुल बारेकर उपस्थित होते.

प्रा. प्रकाश पाठक म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये उमलण्याची क्षमता असते.क्णाला केवळ विकसन करायचे आहे. शहाणपण नावाच्या कर्मात परिवर्तीत होत नाही शिक्षणाला अर्थ नाही. शिक्षणातून पूर्णत्वाचा प्रवास व्हायला हवा. ज्या शिक्षणातून चारित्र्य, तत्व प्राप्त होते. ते शिक्षण स्वामी विवेकानंद यांना मान्य होते. मनाची शक्ति आणि बुध्दीचा विस्तार तसेच स्वत:च्या पायावर उभे राहायला मदत करते अशा शिक्षणाची गरज आहे अशी त्यांची धारणा होती. शिक्षणाने व्यक्तींना समाजाची सेवा करण्यास सक्षम केले पाहिजे आणि मानवतेच्या उन्नतीसाठी योगदान दिले पाहिजे. यावर स्वामी विवेकानंद यांचाविश्वास होता असेही प्रा. पाठक म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी तरूणांचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झालेली आहे. अशा वेळी पालक, शिक्षक आणि महापुरूष हे या तरूणांनादिशा दाखवू शकतात असे मत मांडले. दृष्टी, शिस्त, आवड आणि नैतिक मूल्ये यांची गरज असल्याचेही सांगून प्रा. माहेश्वरी यांनी हॅण्ड, हार्ट आणि हेड या तीन H चा विचार नवीन शैक्षणिक धोरणात केला असल्याचे सांगितले. राजेंद्र नन्नवरे यांनी भारतीय समाज ज्ञानाची जोपासना करणारा असल्यामुळे अभ्यास करून नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला गेला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. म.सु. पगारे यांनी मनोगत व्यक्त केले. निमंत्रक प्रा. अतुल बारेकर यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मुंदडा व ऋग्वेद देशमुख यांनी केले. उद्घाटना नंतरच्या चर्चासत्रात डॉ. एन.के. ठाकरे, डॉ.पराग जहागीरदार (जळगाव), डॉ. अपर्णा लळीकर (पुणे) यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य जगदीश पाटील, प्रा. अनिल डोंगरे हे यावेळी मंचावर उपस्थित होते. उद्या दि. १९ मार्च रोजी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचे निबंध सादरीकरण होईल. दुपारी डॉ.विश्वास देवकर (पुणे) यांच्या उपस्थितीत व प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. या चर्चासत्राला भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद भारत सरकार यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कारमधून विदेशी दारूची तस्करी; धुळे पोलिसांनी मुद्देमालासह दोघांच्या आवळल्या मुसक्या

Next Post

थरारक चोरी! ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चांदीसह रोकड लांबविली

Next Post
थरारक चोरी! ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चांदीसह रोकड लांबविली

थरारक चोरी! ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चांदीसह रोकड लांबविली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025

Recent News

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914