अपघाताची एक मोठी बातमी समोर आलीय. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो कार रस्त्यालगतच्या ५० फूट विहिरीत कोसळली. या अपघातात चालकासह कारमधील चौघांचाही मृत्यू झाला. जामखेडमधील जांबवाडी शिवारात हा अपघात झाला.
अशोक विठ्ठल शेळके (२९), रामहरी गंगाधर शेळके (३५), किशोर मोहन पवार (३०, सर्व रा. जांबवाडी) व वाहनचालक चक्रपाणी सुनील बारस्कर (२५, रा. राळेभातवस्ती, जामखेड) अशी मृतांची नावे आहेत. जांबवाडीकडून हे चौघे तरुण बोलेरा (एमएच २३ एयू ८४८५) गाडीतून जामखेडकडे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येत होते. जांबवाडी शिवारातील मातकुळी रस्त्यालगत चालक चक्रपाणी बारस्कर याचा बोलेरोवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या ५० फूट खोल विहिरीत चौघेही गाडीसह कोसळले. विहिरीत १५ फूट खोल पाणी होते. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जवळच रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील मजूरही मदतीसाठी धावले, जांबवाडी येथील तरुण, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही विहिरीत पडलेल्या आले.
रुग्णवाहिकेतून तातडीने तरुणांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक व मजुरांच्या मदतीने चारही तरुणांना विहिरीच्या बाहेर काढण्यात त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी जाहीर केले. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामीण स्रणालयात ग्रामस्थांसह नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. उत्तरीय तपासणीनंतर तरुणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार केले. या चार मृत तरुणांपैकी दोघांची लग्ने झाली असून त्यांना लहान मुले आहेत.















Discussion about this post