नागपूर । राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून अशातच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एका मामाने उधारीच्या वादातून आपल्या दोन भाच्यांची हत्या केली आहे. बांगड्यांच्या विक्रीतील उधारी फेडण्याच्या वादामुळे हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. रवी आणि दीपक राठोड असं मृत दोन्ही भाच्यांची नावे आहे.
रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना नागपूरच्या गांधीबाग गार्डनजवळ घडली आहे. आरोपीचं नाव बदन सिंह असं आहे. आरोपी हा मृतक रवी राठोड आणि दीपक राठोड यांचा मामा आहे. रवी आणि दीपक हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर आरोपी बदन सिंह हा त्यांचा दूरचा मामा आहे. दोघे भाऊ शहरातील हंसापुरी भागात राहायचे. दोघेही आरोपीकडून बांगडी खरेदी करून त्या शहरात विकायचे, अशी माहिती मिळते.
आरोपी मामा बदन सिंह याचा बांगडी विक्रीचा होलसेलचा व्यवसाय आहे. त्यामुळे रवी आणि दीपक हे मामाकडून बांगडी विकत घ्यायचे आणि शहरात जाऊन ते विकायचे. त्यातून त्यांना चांगली मिळकतही व्हायची. कधी कधी दोघे मामाकडून उधारीवर बांगड्या खरेदी करून त्याची विक्री करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे उधारी राहिली होती. ही उधारी लवकरात लवकर फेडावी म्हणून बदन सिंह हे दोघाांकडे तगादा लावायचे. त्यामुळे दोघांमध्ये कुरबुर झाली. त्यातूनच ही हत्या घडल्याचं सांगितलं जात आहे. या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला तात्काळ अटक केली आहे. त्याच्याकडील शस्त्रही पोलिसांनी जप्त केलं आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.















Discussion about this post