जळगाव । जळगाव जिल्ह्यात २७ आणि २८ डिसेंबर रोजी अवकाळी पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार २७ रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी. शुक्रवारी आलेल्या अवकाळी पावसाने शनिवारी २८ रोजी यलो अलर्ट असूनही हुलकावणी दिली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचा एक थेंबही बरसला नाही. आता ढगांची दाटी कमी होऊन हळुहळू थंडीचा कडाका वाढणार आहे.
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी यलो अलर्ट दिला होता. अपेक्षेनुसार, शुक्रवारी पावसाने जळगाव शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. या अवकाळीने दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला.
शनिवारी मात्र पावसाने अनपेक्षितरित्या खो-खो दिला. दिवसभर अधून मधून ढगाळ वातावरण असूनही पाऊस बरसला नाही. दरम्यान आता ढगांची दाटी कमी होऊन पारा हळुहळू खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरकरांचा ‘थर्टी फर्स्ट’सोबतच नववर्षही कडाक्याच्या थंडीत जाण्याची दाट शक्यता आहे.















Discussion about this post