मुंबई । विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांवर विविध पक्षांकडून कारवाई केली जात असून अशातच काँग्रेसने बंडखोरी करणाऱ्या १६ जणांवर कारवाई केली. या १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षांसाठी काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी महायुती आणि महाविकास आघाडीतील लढत आणखी रंगतदार आणि चुरशीची होत आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार –
आमरोली – आनंदराव गेडाम आणि शिलु चिमूरकर
गडचिरोली – सोनल कोवे आणि भरत येरमे
बल्लारपूर – अभिलाषा गावतूरे आणि राजू झोडे
भंडारा – प्रेमसागर गणवीर
अर्जुनी मोरगांव – अजय लांजेवार
भिवंडी – विलास पाटील आणि आसमा जव्वाद चिखलेकर
मिरा भाईंदर – हुंसकुमार पांडे
कसबा पेठ – कमल व्यवहारे
पलूस कडेगाव – मोहनराव दांडेकर
अहमदनगर शहर – मंगल विलास भुजबळ
कोपरी पाचपाखाडी – मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे
उमेरखेड – विजय खडसे
यवतमाळ – शबीर खान
राजापूर – अविनाश लाड
कटोल – याज्ञवल्क्य जिचकार
रामटेक – राजेंद्र मुळक















Discussion about this post