सांगली । राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असून यातच या वादावर अखेर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उघड भूमिका घेतली आहे. त्यांनी ओबीसींच्या बाजूने उघडपणे भूमिका घेतली असून हा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी महत्त्वाचं आवाहन केलं. “ओबीसींच्या डोक्यात खूळ बसली आहे की, हिंदू खत्रे में हैं. पण हे खूळ बाजूला करावे लागेल. हे खूळ भाजपने उभं केलं आहे. भाजप ओबीसींच्या बाजूने का नाही? त्यामुळे हे धर्माचं भूत उभं केलं आहे. या निवडणुकीत आरक्षण वाचायचं की जाऊन द्यायचं, तर स्वतःला मतदान करायचं आहे. एक छगन भुजबळ निर्माण करून चालणार नाही, अनेक भुजबळ उभे करावे लागणार आहेत. 100 ओबीसींचे आमदार निवडून आले पाहिजेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“ओबीसी 57 जागा राखीव आहेत. तर याच्यावर नजर असणार आहे. या निवडणुकीत आरक्षण बचाव हा मुद्दा असणार आहे. पण कुठलीही पार्टी आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहे की नाही हे पाहणार आहे. किमान 100 ओबीसींचे उमेदवार निवडून आणणार का? हे पाहावे लागेल. सगेसोयरे कायदा आणायचा यांनी ठरवले तर छगन भुजबळ थांबवू शकत नाहीत. कारण आपले संख्याबळ नाही. त्यामुळे हे सर्व पक्ष ओबीसींच्या विरोधात आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीत पक्ष बघू नका, स्वतः कडे बघा, आरक्षण वाचवणाऱ्याकडे बघा”, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.















Discussion about this post