मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांतील भाजपला आलेले अपयश, राज्यात महायुतीची झालेली पिछेहाट त्याउलट महाविकास आघाडीला मिळालेले दैदिप्यमान यश अशा पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध पक्षांचे आमदार एकमेकांना भेटल्यावर हितगूज करत होते.
साहजिक लोकसभा निवडणुकांच्या निकालांवरून कधी टोमणे तर कधी वास्तववादी गप्पा आमदारांमध्ये सुरु होत्या. दुसरीकडे सकाळी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर, पर्वती विधानसभेच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांची भेट झाली.
यावेळी पक्षात प्रवेश करण्याआधीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली आहे. या भेटीत अनेकानेक मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली. नव्यांना पक्षात संधी मिळते मात्र आपल्याला थांबा थांबा सांगतात हे अतिशय वाईट आहे, असे म्हणत आपल्या मनातील खदखद नाथाभाऊंनी बोलून दाखवली.















Discussion about this post