जळगाव । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त ९ जागा जिंकता आल्या आहेत. यातच पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकरमधून कार्यमुक्त करण्याची इच्छा वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. मात्र यात आता जळगावच्या वर्तमानपत्रात एकनाथ खडसे यांच्यावर आलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टायगर अभी जिंदा है अशा आशयाची एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातील एका जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

‘टायगर अभी जिंदा है’ असा डायलॉग लिहीलेली ही जाहिराच पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . एवढंच नव्हे तर ‘ एहसास से मजबूर ना समझो गुलशन से बहुत दूर ना समझो मुझको, मै आज भी इतिहास बदल सकता हू इतना भी कमजोर ना समजो मुझको’ असेही या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. जळगावत रक्षा खडसे यांचा विजय झाला. त्यांच्या विजयानंतर सर्वच समीकरण बदलून गेली आहेत.
तर भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवासी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या मित्रपरिवार आणि समर्थकांकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना डिवचण्यात आल्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जळगावात रंगली आहे. यामुळे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा वाक् युद्ध रंगण्याची शक्यता आहे.















Discussion about this post