नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचा जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर दिग्गज नेते उपस्थित होते.
संपूर्ण देशाला भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतिक्षा असते. या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात उद्योजकतेवरही लक्ष देण्यात आलं आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेभर भर देण्यात आला आहे. जनतेला पुढील पाच वर्षांपर्यंत मोफत रेशन मिळेल. पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतील. जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असंही पंतप्रधान मोदी यांनी संबोधन करताना सांगितलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, अशी मोदींची गँरटी आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही काम करणार आहे. इको टुरिझमसाठी नवी केंद्र सुरु करणार आहेत. 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु केले जाणार आहे. सरकारच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्यात येत आहे. टेलिमेडिसिनचा विस्तार केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा
रोजगार आणि उद्योजकतेभर भर
मोफत रेशन योजान पुढील पाच वर्ष सुरु राहणार
आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, 70 वर्षांवरील वृद्धांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार, तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार
गरीबांसाठी चार कोटी घरे बांधणार
पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवणार
वीजबिलाचा शून्य करण्यासाठी काम करणार, कोट्यवधी कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आणि विजेपासून कमाईच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही काम करू. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करणार
गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार
कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार
महिलांसक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर, 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिला बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन या क्षेत्रात प्रशिक्षण देणार
मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाखांवर, मुद्रा योजनेंतर्गत यापूर्वी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा वाढवून 20 लाख करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मला विश्वास आहे की इंडस्ट्री 4.0 च्या युगासाठी आवश्यक असलेली इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक नवीन शक्ती म्हणून याचा वापर केला जाईल.















Discussion about this post