मुंबई : शिक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असून मात्र अनेकदा पैशांच्या अभावामुळे मुलींना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागत. मात्र आता महाराष्ट्रातील सर्व मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही, असं होणार नाही. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यांनी मुलींच्या शैक्षणिक फीबाबत मोठी घोषणा केली आहे.
1 जून पासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी तसेच अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींची मुलींची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार आहे. मुलींच्या फी साठी आम्ही 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच याचा जीआर निघणार आहे, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात बोलताना केली आहे.
होस्टेलच्या खर्चाबाबत काय म्हणाले?
शैक्षणिक फी बरोबरच ज्या मुला-मुलींना होस्टेल मिळालेले नाही. अशांना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो सिटीमधील विद्यार्थी-विद्यार्थीनीना दरमहा 6 हजार दिले जाणार आहेत. त्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये 5300 तर तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांना 3800 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ता मिळणार आहेत. या निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा आहे. विद्यार्थिनींना हा भत्ता थेट डिबीटीद्वारे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Discussion about this post